आज मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा दिवस होता, सरकारी कर्मचारी आणि बँकांमध्ये हक्काची सुट्टी, आता हक्काची सुट्टी म्हटली म्हणजे... मतदानाचा हक्क बर का. तो खरच किती जन बजावतात तोही चर्चेचा विषय आहे .. आता काय... चर्चा - चर्चा - चर्चा बसं एवढच उरले का असा प्रश्न पडतो... सगळ्या News Chennel वाल्यांना एकाच काम .. तोंडाची वाफ नेते कसे वाया घालवतात ..आणि .. प्रचारात विकत आणलेल्या बाहुल्या कशा टाळ्या वाजवतात... हेच दाखवायचे का असते कोणास ठाऊक.
कॉर्पोरेट मध्ये आणि IT मध्ये सुट्ट्या मिळणे म्हणजे जणू आठवडाभर कोणीतरी नाक दाबून ठेवले आहे आणि एक दिवस श्वास घ्यायला उसंत.. नियमाप्रमाणे कर्मचार्यांना आणि कॉर्पोरेट मध्ये बॉस च्या चाबुकाच्या धाका खाली काम करणाऱ्या EXCUTIVE गाढवांना मतदानास कामाच्या वेळेमधून मतदान करण्यासाठी सकाळी २ तास उशिराने किंवा २ तास लवकर जाण्याची मुभा दिलेली असते.
आता काही जण म्हणत असतील की तरुण पिढीला मतदान करण्यात इंटरेस्ट नसतो .. पण जर सोशल नेटवर्किंग वरच तरुण पिढी प्रतिसाद देत असेल तर ती.. मतदान करण्यासाठी सुद्धा मतदान केंद्रावर तेवढ्याच उत्साहाने आणि शिस्तबद्धपणे रांग लावण्यास जमते..
आज सकाळी मतदान करायला केंद्रावर गेलो तेव्हा माझीच शाळा मला मतदान केंद्र म्हणून आली. तेव्हा सहज विचार येऊन गेला मनात की .. मतदान केंद्रे ही नेहमी शाळेतच का ठेवतात.. उगाच मुलांच्या शाळा दोन दिवस बुडतात. पण " शिशु वर्गात " एक काढलेले चित्र पाहून वाटले .. सुज्ञ पणे विचार केला तर लक्षात येईल, शाळा हे विद्येचे मंदिर आहे.. आपले संस्कार, आचार विचार, योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि आपले मत मांडण्याची नैतिक पद्धत आपल्याला शाळेतच शिकवली जाते.. या सर्व गोष्टी आपण स्मरून मग सुज्ञ पणे विचारपूर्वक मत दिले पाहिजे असा त्या मागचा हेतू असावा का कदाचित ?
तसा आज घरीच होतो.. मतदान करून आल्यावर Laptop चालू केला पण पुढ्यात पडलेली " प्राण जाये पर शान न जाये" सिनेमाची सीडी दिसली .. आणि खूप दिवसांनी तो सिनेमा पहिला, त्यातली ती चाळ, तिथली वस्ती, भांडणे, प्रेम आणि बऱ्याच गमतीजमती सगळे काही ओळखीचे वाटले ... अरेरे हो ... मी पण गिरगावात एका चाळीतच राहतो की.. सार काही अगदी तसच.. अगदी "बिल्डर" नावाच्या सापांनी सुद्धा त्या सिनेमासारखा गिरगावाला विळखा घातला आहे .. हे लक्षात आले..
असच हा आजचा योगायोग.. तरुणांच्या कानी घालावा असे वाटले..
कॉर्पोरेट मध्ये आणि IT मध्ये सुट्ट्या मिळणे म्हणजे जणू आठवडाभर कोणीतरी नाक दाबून ठेवले आहे आणि एक दिवस श्वास घ्यायला उसंत.. नियमाप्रमाणे कर्मचार्यांना आणि कॉर्पोरेट मध्ये बॉस च्या चाबुकाच्या धाका खाली काम करणाऱ्या EXCUTIVE गाढवांना मतदानास कामाच्या वेळेमधून मतदान करण्यासाठी सकाळी २ तास उशिराने किंवा २ तास लवकर जाण्याची मुभा दिलेली असते.
आता काही जण म्हणत असतील की तरुण पिढीला मतदान करण्यात इंटरेस्ट नसतो .. पण जर सोशल नेटवर्किंग वरच तरुण पिढी प्रतिसाद देत असेल तर ती.. मतदान करण्यासाठी सुद्धा मतदान केंद्रावर तेवढ्याच उत्साहाने आणि शिस्तबद्धपणे रांग लावण्यास जमते..
आज सकाळी मतदान करायला केंद्रावर गेलो तेव्हा माझीच शाळा मला मतदान केंद्र म्हणून आली. तेव्हा सहज विचार येऊन गेला मनात की .. मतदान केंद्रे ही नेहमी शाळेतच का ठेवतात.. उगाच मुलांच्या शाळा दोन दिवस बुडतात. पण " शिशु वर्गात " एक काढलेले चित्र पाहून वाटले .. सुज्ञ पणे विचार केला तर लक्षात येईल, शाळा हे विद्येचे मंदिर आहे.. आपले संस्कार, आचार विचार, योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि आपले मत मांडण्याची नैतिक पद्धत आपल्याला शाळेतच शिकवली जाते.. या सर्व गोष्टी आपण स्मरून मग सुज्ञ पणे विचारपूर्वक मत दिले पाहिजे असा त्या मागचा हेतू असावा का कदाचित ?
तसा आज घरीच होतो.. मतदान करून आल्यावर Laptop चालू केला पण पुढ्यात पडलेली " प्राण जाये पर शान न जाये" सिनेमाची सीडी दिसली .. आणि खूप दिवसांनी तो सिनेमा पहिला, त्यातली ती चाळ, तिथली वस्ती, भांडणे, प्रेम आणि बऱ्याच गमतीजमती सगळे काही ओळखीचे वाटले ... अरेरे हो ... मी पण गिरगावात एका चाळीतच राहतो की.. सार काही अगदी तसच.. अगदी "बिल्डर" नावाच्या सापांनी सुद्धा त्या सिनेमासारखा गिरगावाला विळखा घातला आहे .. हे लक्षात आले..
असच हा आजचा योगायोग.. तरुणांच्या कानी घालावा असे वाटले..
No comments:
Post a Comment