Sunday, 14 October 2012

आज भारत चीन युद्धाला ५० वर्ष पूर्ण झाली.

आज भारत चीन युद्धाला ५० वर्ष पूर्ण झाली. दिवसभर प्रिंट आणि इलेक्ट्रोनिक मिडीयाने बऱ्याच कथा (Documentaries) दाखवल्या. त्या युद्धात आपण हरलो कारण कमी प्रतीची व जुनी हत्यारे वापरली गेली तसेच आपल्या संरक्षण मंत्रालयाची काही पावले चुकीची पडली.

विषय असा आहे त्या ५० वर्षानंतर जागतिक महासत्ता होण्याची स्वप्ने पाहणारे आपण आज कुठे आहोत ?

त्या युद्धात सुद्धा आपले जवान शर्थीने लढले होते, आणि अजूनही आपल्या जवानांमध्ये ती देशभक्ती कायम आहे. फक्त वाईट एवढेच वाटते की शस्त्रे अजूनही आधुनिक नाहीत.
Short Range, Mid Range आणि Long Range अशा वेगवेगळ्या Assault  Rifles तसेच आधुनिक Bullet Proof Jackets आज आहेत पण आपल्या सुरक्षायंत्रणेकडे काहीच नाही. LOC वरचे जवान असोत किंवा मुंबई शहरात २४ तास ऑन ड्युटी असणारे पोलीस असोत. 

आपण अजूनही ठेच लागल्याशिवाय सुधारत नाहीत. आणि सुधारण्याची गती सुद्धा तितकीच वाखाणण्याजोगी... कारगिल युद्धात वापरलेल्या बोफोर्स तोफांचा खरेदी घोटाळा अजून सुटलाच नाहीये आणि रशियाच्या भंगारातून विकत घेतलेली आणि अंदाजे १२,००० करोड रुपये खर्चून आणि तीसुद्धा वेळेवर म्हणजेच २००९ सालात Commisson न केल्यामुळे रशियाला ५% म्हणजे ५०० करोड दंड आकारून, अजून "INS VIKRAMADITYA " (पूर्वश्रमीची Admiral Gorshkov )  १००% दुरुस्त करून आता आपल्याला २०१३ साली मिळणार आहे. आणि हा अजून एक संरक्षण महाघोटाळा बनून समोर येण्याची भीती वाटते.

आज चीन बंगालच्या उपसागरात पाय रोवतेय, अरबी समुद्रात तर त्यांच्या आण्विक पाणबुड्या ऑलरेडी फिरतायत आणि आता Aircraft Carriers त्यांच्या ताफ्यात भरती करण्याचा सपाटाच लावलाय.
आपल्या नंतर चीन ने रशियाला order देऊन त्यांची Aircraft Carrier Commisson करून घेतली, आणि आपण अजून वाटच पाहत बसलोय.

एक काय ते "Brahmos Atomic Capable Long Range Ballistic Missile"  बनवल्यामुळे म्हणे चीन च्या पोटात गोळा आलाय. एवढ्यावरच खुश आहोत आपण.
अमेरिकेबरोबर केलेला JAF - F35 चा करार पूर्णत्वास यायला अजून बराच वेळ आहे. एकाच "INS AARIHANT " बनवली आहे, आणि तिचा उदो उदो करत बसलोय..

गेल्या काही वर्षापूर्वी बातमी वाचली होती की, IAF ची एक Secret File गटारात सापडली होती. Secret Documents किती सुरक्षित आहेत तो वेगळा मुद्धा,पण आपण World War ३(Cyber War ) जे ऑलरेडी चालू झाले आहे, त्यात आपण सुद्धा ओढले जातोय. चीनी आपल्या कितीतरी Web Sites Hack करतायत, आणि या चीनी hackers नी संपूर्ण जगभर दहशत निर्माण केली आहे. 
भारतात ३G आणि ४ G तंत्रज्ञान आले आहे, WiFi  Hub बनू पाहणाऱ्या मुंबई-पुणे-बंगलोर-चेन्नई अशा शहरात किती Network सुरक्षित आहे कोण जाणे? मोबाईल वर सगळी कामे करणारी हाय टेक पिढी या सर्व धोक्यापासून खूप अनभिज्ञ आहे.

इतके सर्व असून आपण फक्त, महागाई- घोटाळे-लैंगिक अत्याचार- आतंकवाद - स्त्री भ्रूण हत्या- भ्रष्टचार - बेरोजगारी-शेतकरी आत्महत्या- रिसेशन - संसाराचे गाडे - चूल-मुल - बायको -घर- प्रेयसी- मित्र - पार्टी हेच करतोय .

आपण तिरंग्यातले ते तीन रंग- ते अशोक चक्र तो सम्राट अशोक, शिवाजी महाराजांनी रुजवलेली गानिमिकावे- भारताचे पहिले आरमार- आणि बहिर्जी नाईक यांचे गुप्तहेर खाते, हे सर्व आपण विसरलोय का ?

1 comment:

  1. bahutek ho.. saglegan aplya sansarat so called busy jhale aahet..

    ReplyDelete